Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बनारसला हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये शिकत असताना लाल बहाद्दूर शास्त्रींना खरे गुरु भेटले. त्यांचे नाव निष्कामेश्वरजी मिश्रा होय. मिश्राजी शाळेत अभ्यासक्रमाबरोबर ऐतिहासिक नेत्यांच्या गोष्टी सांगत असत. त्यातून राष्ट्रीय चळवळीची माहिती मुलांना मिळत असे. अशा गोष्टीतून मुलांचे राष्ट्रावरील प्रेम दृढ होत होते. याच काळात लालबहाद्दुरांना लोकमान्य व महात्मा गांधींची भाषणे ऐकावयास मिळाली. त्याचा चांगला परिणाम दिसू लागला.

Saturday, September 04, 2010 AT 01:01 AM (IST)

एके दिवशी विश्वेश्वरैया रेल्वेने प्रवास करीत होते. प्रवासात ते नेहमी ग्रंथांचे वाचन करीत असत. त्यांच्या समोरचे प्रवासी पत्ते खेळत मोठमोठ्याने गप्पागोष्टी करीत होते. अशावेळी विश्वेश्वरैया वाचत असताना एकदम उठले व त्यांनी डब्यातील साखळी ओढली व पुन्हा ते वाचण्यात मग्न झाले. साखळी खेचताच गाडी थांबली आणि गार्ड चौकशीला आला.

Thursday, September 02, 2010 AT 10:50 PM (IST)

एकदा दीनदयाळजी बाजारात भाजी आणावयास गेले असता एक वृध्द बाईजवळून त्यांनी भाजी विकत घेतली. नंतर दीनदयाळजींनी नेहमीप्रमाणे सर्व हिशोब लिहिला व पैसे परत ठेवताना त्यांच्या लक्षात आले की, आपल्या खिशातील एक खोटा पैसा त्या वृध्द स्त्रीला भाजीचे पैसे देताना चुकून दिला गेला. आपण त्या म्हाताऱ्या बाईला नकळत का होईना फसविले, याचे दु:ख त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होते.

Wednesday, September 01, 2010 AT 10:50 PM (IST)

एके दिवशी शंकरनंदन आपल्या शिष्याबरोबर बसले होते. त्यावेळी राज्याचा राजासुध्दा तेथे होता. अशावेळी आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्याचे त्यांनी ठरवले आणि त्यांनी साऱ्यांना एकच प्रश्न विचारला, "तुमच्या जीवनाचे ध्येय काय आहे?' यावर निरनिराळी उत्तरे गुरुंना व राजाला ऐकावयास मिळाली. हे सर्व झाल्यावर मायणाचार्यांचा मुलगा माधवाचा नंबर आला. माधव म्हणाला, "गुरुवर्य तुमच्या प्रश्नाचे उत्तर कठीण आहे. तरी पण सांगतो. माणसाच्या मनात अहंकाराचा दर्प आहे.

Tuesday, August 31, 2010 AT 11:05 PM (IST)

करवीर नरेश राजर्षी शाहू महाराज हे प्रजाहितदक्ष राजे होते. प्रजा सुखी तर राजा सुखी. प्रजेच्या हितातच राजाचे हित आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आपल्या रयतेची कोणी फसवणूक केली, लुटमार केली तर त्यांना सहन होत नसे. एकदा शाहूराजे शिकारीसाठी पन्हाळ्याच्या जंगलात गेले होते. दुपारी विश्रांतीसाठी थांबले असता अनेक गावकरी, अधिकारी राजांना भेटावयास आले. भोजनाचा मोठा कार्यक्रम होता. महाराजांनी सर्वांच्या बरोबर भोजन केले.

Monday, August 30, 2010 AT 11:15 PM (IST)

ब्रिटिश सरकारने लोकमान्य टिळकांच्यावर राजद्रोहाचा खटला भरून त्यांना मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षे ठेवले होते. तेथेच त्यांनी रात्रंदिन वाचन, चिंतन करून जगन्मान्य गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. शिक्षा संपल्यावर ते भारतात परत आले. तुरुंगात असताना त्यांचे फार हाल झाले होते. त्यांची प्रकृती पार ढासळली होती. तशाही स्थितीत त्यांनी पुन्हा आपल्या देशकार्याला जोरात सुरुवात केली. खरे तर त्यांना आता पूर्ण विश्रांतीची गरज होती.

Sunday, August 29, 2010 AT 09:30 PM (IST)

एकदा एक सज्जन मनुष्य आपल्या नास्तिक मित्राबरोबर नाशिकला गेला. तेथे गोदावरीच्या पाण्यात उभा राहून तो आपल्या स्वर्गस्थ पितरांना जलांजली देऊ लागला.

Saturday, August 28, 2010 AT 11:15 PM (IST)

बंगालमधील देशबंधू चित्तरंजन दास बंगाली भाषेतील मोठे लेखक होते. व्यवसायाने वकील होते आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ते अत्यंत उदारचरित होते. त्यांना आधुनिक काळातील कर्ण असे म्हणत असत. त्यांच्याकडे कुणी काही मागावयास आले तर ते "नाही' म्हणत नसत. कुणालाही रिकाम्या हाती परत पाठवीत नसत. एकदा एक गरीब ब्राह्मण त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, "माझ्या मुलीचे लग्न करावयाचे आहे. पण माझ्याजवळ पैसे नाहीत.

Saturday, August 28, 2010 AT 12:07 AM (IST)

थोर शास्त्रज्ञ एडिसन वीस-वीस तास संशोधनाचे काम करीत असत. मानव प्राणी सुखी करणे हे त्यांचे ध्येय होते. ग्रामोफोनचा शोध त्यांनीच लावला. कंटाळा असा त्यांना माहितच नव्हता. निराशा हा शब्दच त्यांना आवडत नसे. तहान-भूक याचे त्यांना भानच नव्हते. दिवस कधी संपतो, रात्र कधी सुरु होते याकडे त्यांचे लक्ष नसे. वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी ते म्हणाले होते, "मी अजून शंभर वर्षे संशोधन कार्य करीन. त्यासाठी हजारो विषय माझ्या डोक्यात आहेत.

Thursday, August 26, 2010 AT 11:03 PM (IST)

लोकमान्यांची परमेश्वरावर नितांत श्रध्दा होती. पण तिचे ते कधीही जाहीर प्रदर्शन करीत नसत. त्यांनी गीतारहस्याची पाहिली प्रत पंढरपूरला श्री पांडुरंगाला अर्पण केली. दुसरी प्रत पुण्याच्या कसबा गणपतीला व तिसरी प्रत महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांना स्वत: अर्पण करुन त्यांचे आशीर्वाद घेतले. एकदा वऱ्हाड प्रांतातील एका गावात लोकमान्यांच्या सत्काराचा समारंभ होता. लोकमान्यांना समारंभपूर्वक कार्यक्रमाच्या ठिकाणी आणले. लोकमान्यांसाठी गालिचा घातला होता.

Wednesday, August 25, 2010 AT 11:19 PM (IST)

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: