Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोल्हापूर वार्तापत्र राजीव वाबळे देशातील पर्यटन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या केसरी टूर्सच्या कार्यकारी संचालिका वीणा पाटील यांनी कोल्हापूर भेटीचेवेळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि पर्यटनप्रेमी यांच्या बरोबर मनमोकळेपणाने, दिलखुलास संवाद साधला. मलेशियासारखा महाराष्ट्राच्या आकारमानाचा देश पर्यटन क्षेत्रात मोठी मजल, उंची गाठू शकतो. मात्र भारतामध्ये पर्यटन वृध्दीसाठी मुख्यत्वे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे.

Saturday, September 04, 2010 AT 12:58 AM (IST)

  क्रिकेटमधील सर्वात मोठा भ्रष्टाचार ठरेल एवढे मोठे मॅच फिक्सिंगचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सच्चा क्रिकेटप्रेमीही या खेळापासून दूर जाईल. समोर आलेली माहिती किरकोळ वाटावी एवढी माहिती रोज बाहेर येत आहे. पैशासाठी काही खेळाडू देश आणि खेळाची विक्री करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. खेळ वाचवायचा असेल तर स्वार्थाने लडबडलेली ही पिल्लावळ वेळीच ठेचून काढायला हवी.

Thursday, September 02, 2010 AT 10:45 PM (IST)

  एप्रिल 2011 पासून डायरेक्ट टॅक्स कोड अस्तित्वात येत आहे. यामुळे कररचनेत सुटसुटीतपणा येऊन करदात्यांना कर भरणे सुलभ जाईल, असे अर्थमंत्रालयाला वाटते. आयकरा-संदर्भातील कायद्यातील हा बदल स्वागतार्ह असला तरी करप्रशासनात काही बदल अंमलात येणे आवश्यक आहे. आयकर विभागाशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आणि अन्य अनेक तक्रारी वारंवार पुढे येतात.

Wednesday, September 01, 2010 AT 10:48 PM (IST)

""साप्ताहिक ऐक्यचे दैनिकात रुपांतर करताना संपादक सुरेश पळणिटकर यांच्याकडे निर्धार, धाडस, परिश्रम आणि लोकमताचा पाठिंबा एवढेच भांडवल होते. त्या बळावरच त्यांनी दै. ऐक्यचा दबदबा निर्माण केला. सर्वार्थाने लोकपत्रकार असलेल्या सुरेश पळणिटकर उर्फ दादांचा बुधवार, दि. 1 सप्टेंबर 2010 रोजी (आज) आठवा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या पत्रकारितेच्या कार्याचा हा मागोवा..

Wednesday, September 01, 2010 AT 12:27 AM (IST)

  गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील राजकारणाला अचानक "तोडपाणी' संस्कृतीची जाणीव झाली. त्याला कारणीभूत ठरले दस्तुरखुद्द कृषिमंत्री शरद पवार. त्यांनी राज्यातले विरोधक "तोडपाणी' करत असल्याची तक्रार केली. या तक्रारीला चोख उत्तर देताना विरोधकांनीही "चोराच्या चोरवाटां'चा उल्लेख केला. भारतीय राजकारणात ही संस्कृती कशी आणि कधी वाढली, याचा विचार पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीच करायला हवा. राजकारणात डाव-प्रतीडाव चालायचेच.

Monday, August 30, 2010 AT 11:11 PM (IST)

मुंबई वार्तापत्र/अभय मांडवेकर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असली तरी या शहरातील मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात मराठी चित्रपटांना स्थान मिळत नव्हते. मराठी चित्रपट प्रदर्शित केले नाही तर, हिसका दाखवू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. पाठोपाठ शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे हे मराठी चित्रपट निर्मात्यांच्या बाजूने उभे राहिले. सरकारनेही याबाबत कारवाई करायची ग्वाही दिली. आता राजकीय श्रेयासाठी वाद सुरु झाला आहे.

Sunday, August 29, 2010 AT 09:35 PM (IST)

पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा जनाधार मिळत असल्याचा हायटेक प्रचार करत भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीसह "मिशन पश्चिम महाराष्ट्र' कोल्हापुरात पार पडले. आ. चंद्रकांतदादा पाटील, आ. सुरेश हळदणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचतारांकित दर्जाच्या सुविधांसह पाहुण्यांची बडदास्त चोख ठेवली. त्यामुळे ऐन श्रावण महिन्यामध्ये खास कोल्हापुरी तांबडा, पांढऱ्या रस्स्यासह सामिष आहारावर ताव मारण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही.

Saturday, August 28, 2010 AT 12:03 AM (IST)

मॉल आणि सुपर मार्केटच्या आगमनानंतर देशभरातील ग्राहकांच्या मानसिकतेत बदल झाला असून ही मानसिकता म्हणजेच ग्राहकाची नाडी ओळखण्यासाठी सर्व उत्पादक कंपन्या हर तऱ्हेचे प्रयत्न करत असतात. यासाठी विविध स्तरांवर पाहण्या केल्या जातात आणि त्यातून समोर आलेल्या निष्कर्षांचा व्यवसायवृद्धीसाठी वापर केला जातो. ब्रिटिशपूर्व काळात भारतात स्वयंपूर्ण खेड्यांची संकल्पना होती.

Thursday, August 26, 2010 AT 11:01 PM (IST)

    दिल्लीत असूनही राज्यातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या खासदारांची, केंद्रीय मंत्र्यांची संख्या कमी नाही. किंबहुना तो राजकारणाचा अपरिहार्य भाग मानला जातो. आपल्या खात्याच्या कारभारावर लक्ष ठेवणे मंत्र्याचे कर्तव्य ठरते. असे असताना ममता बॅनर्जी रेल्वे खात्याऐवजी राज्याच्या राजकारणावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. शिवाय सरकारच्या कारभारावर टीका करून पंतप्रधानांना अडचणीत आणत आहेत. बहुतेकांच्या राजकारणाची सुरूवात गल्लीपासून होत असते.

Wednesday, August 25, 2010 AT 11:18 PM (IST)

लास व्हेगासमध्ये पार पडलेल्या "मिस युनिव्हर्स 2010' स्पर्धेच्या झगमगत्या सोहळ्यात मेक्सिकोची जेमिना नवारते विश्वसुंदरी ठरली. 83 स्पर्धकांना मागे टाकत आत्मविश्वास, जिद्द, चुणूक, सौंदर्य आणि बुद्धिचातुर्य या निकषांवर सरस ठरत नवारतेने बाजी मारली. याआधी तिने 2009 मध्ये  "न्यूएस्ट्रा बेलेझा मेक्सिको' ही स्पर्धा जिंकली होती. "मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकल्यानंतर नवारतेचा आनंद गगनात मावत नव्हता.

Wednesday, August 25, 2010 AT 12:33 AM (IST)

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: