Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
  गेल्या काही वर्षात क्रिकेट हा पैशांचा खेळ झाला. मनोरंजनासाठी क्रिडांगणावरच चिअर गर्ल्स नाचवायचा नवाच उद्योग सुरु झाला. खेळाडूंना पैशाची चटक लागली. खेळाचा आत्मा हरवला. खेळाडूंच्या पार्ट्या सामन्यानंतर रंगायला लागल्या. त्यासाठी हजारो रुपये मोजणारे छंदी-फंदी निघाले. आता तर सामना निश्चितीच्या चव्हाट्यावर आलेल्या घटनेने क्रिकेटची काळी दुनिया चव्हाट्यावर आली आहे.

Monday, May 20, 2013 AT 11:45 AM (IST)

  गुंतवलेली रक्कम लवकर दुप्पट व्हावी या लोभापोटी चिटफंड वा तत्सम कंपन्यांमध्ये ठेवी ठेवण्याकडे अनेकांचा ओढा असतो. पण बरेचदा अधिक व्याज सोडा गुंतवलेली रक्कमही पदरात पडत नाही. या पार्श्वभूमीवर मल्टीलेव्हल मार्केटिंगमध्येही अनेक कंपन्या आल्या आणि गेल्या. चिटफंडप्रमाणे या क्षेत्रातही अडीअडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी संभाव्य फायद्या-तोट्यांचा विचार गरजेचा ठरतो.

Saturday, May 18, 2013 AT 11:25 AM (IST)

  भ्रष्टाचार आणि अस्थैर्याच्या मुद्द्‌यावर कर्नाटकमध्ये भाजपाचा अपेक्षित पाडाव झाला. बेळगावमध्ये कन्नडीकरणावर भर दिल्याचा फटकाही भाजपाला बसला. दुसरीकडे येडीयुरप्पांचे उपद्रवमूल्य आणि कॉंग्रेसला तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसणे याचेही पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या अस्ताला कारणीभूत ठरलेले घटक आणि सीमावर्ती भागात मराठी जनतेने खेचून आणलेली विजयश्री या मुद्द्‌यांचा बेळगावमधून घेतलेला वेध.

Friday, May 17, 2013 AT 11:28 AM (IST)

युत्या-आघाड्यांच्या सरकारां-पायी "गव्हर्नन्स'चा दर्जा खालावला असून देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची राजकीय इच्छाशक्ती हरवली आहे. अर्थ-कारणाचा पाया बुलंद रहावा, अर्थव्यवस्थेतील पुरवठ्याची बाजू सुदृढ रहावी यासाठी दीर्घदृष्टीच्या धोरणांची अंमलबजावणी करण्या-ऐवजी लोकानुनयी योजना आखण्या-कडे आघाडी सरकारांचा कल राहतो.

Thursday, May 16, 2013 AT 11:35 AM (IST)

    पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) चे नेते नवाझ शरीफ यांनी तिसऱ्यांदा पाकिस्तानची सत्ता हस्तगत करणे हा मोठा राजकीय चमत्कार म्हटला पाहिजे. भारताच्या दृष्टीने हा सत्ताबदल स्वागतार्ह ठरावा. वाजपेयींनी लाहोर बसप्रवासाने आरंभ केलेली शांतताप्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यास शरीफ उत्सुक आहेत. अर्थात पाकिस्तानातील कुठल्याही सरकारला गृहित धरणे किंवा अवाजवी अपेक्षा ठेवून गाफील राहणे भारताला हितावह नाही.

Wednesday, May 15, 2013 AT 11:26 AM (IST)

अलीकडे अनेक क्षेत्रात, विशेषत: उच्चभ्रू वर्गात व्यसनाधिनतेकडे वळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अलीकडे कोणते ना कोणते व्यसन असणे ही प्रतिष्ठेची बाब बनत आहे. त्यामुळे तरुण मंडळी तसेच उच्चभ्रू समाजात व्यसनांकडील ओढा वाढला आहे. शिवाय व्यसनामुळे वेगळाच आनंद मिळतो, रिलॅक्स वाटते, ताण-तणाव कमी होतो असेही गैरसमज आहेत. ते वेळीच दूर केल्यास तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवणे शक्य होईल. अलीकडे तरुणांमधील वाढती व्यसनाधिनता हा मोठा चिंतेचा विषय बनत आहे.

Tuesday, May 14, 2013 AT 11:19 AM (IST)

उत्तर भारतातल्या ध्रुपद शास्त्रीय संगीताची घराण्याची परंपरा जतन करीत, तिचा देश-विदेशात प्रसार करणाऱ्या पद्मश्री उत्साद झिया फरिदुद्दीन डागर यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राने मोलाचा हिरा गमावला आहे. डागर यांचा जन्म 15 जून 1932 रोजी उदयपूर येथे झाला. त्यांचे वडील उत्साद झियाउद्दीन खॉं साहेब हे उदयपूर संस्थानचे  महाराणा भूपाल सिंग यांच्या राजवटीत दरबारी गायक होते.

Saturday, May 11, 2013 AT 11:38 AM (IST)

  कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणात सीबीआयने सर्वोच्च न्याया-लयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात कायदामंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाने स्टेटस रिपोर्टमध्ये बदल केल्याचा उल्लेख केला. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने सरकारला खडसावले. सीबीआयची अवस्था बंद पिंजऱ्यातील पोपटासारखी असून मालक सांगेल त्याप्रमाणे त्याला वागणे भाग पडत आहे. एवढेच नव्हे तर सीबीआयचे अनेक मालक आहेत असेही न्याया-लयाने स्पष्ट केले. केंद्र सरकारसमोरील अडचणी कमी होण्याऐवजी वाढत आहेत.

Saturday, May 11, 2013 AT 11:37 AM (IST)

      राज्यातील तापमान वाढत चालले असून असह्य उष्णतेने जनता हैराण झाली आहे. साहजिक साऱ्यांना आता मान्सूनचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने विचार करायचा तर सध्याची तीव्र उष्णतेची स्थिती पावसासाठी अनुकूल आहे. सद्यस्थितीत अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे विषुववृत्तावर ढग तयार होऊ लागले आहेत. असे असले तरी मान्सूनबाबत आताच काही अंदाज बांधणे उचित ठरणार नाही.

Friday, May 10, 2013 AT 11:19 AM (IST)

    देशातील वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यात अजूनही यश येत नसल्याचे 2011 मधील जनगणनेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अंतिम आकडेवारीवरून दिसून येते. या आकडेवारीनुसार देशाच्या लोकसंख्यावाढीचा वेग गेल्या दशकाच्या तुलनेत चार टक्के अधिक राहिला. साक्षरतेबाबत आपण बऱ्यापैकी बाजी मारली असली तरी लोकसंख्यावाढीचा वेग रोखणे आणि 100 टक्के साक्षरतेचे स्वप्न पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

Thursday, May 09, 2013 AT 11:21 AM (IST)

© Copyrights 2013 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: